शेतकऱ्यांनो करा काहीतरी हटके ; सरकारी अनुदान योजनांच्या सहाय्याने करा कमी खर्चिक व सर्वाधिक फायदेशिर वराहपालन व्यवसाय !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Varah Palan Yojana ] : शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले पाहीजे , नवनविन शेतीला जोडधंदा शोधला पाहिजे , कोणत्या व्यवसायाची लाज न बाळगता व्यवसाय केला पाहिजे , यांमध्ये वराह पालन हा व्यवसाय कमी खर्चिक व सर्वाधिक फायदेशिर असणारा आहे .

सध्या तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात वराहपालनाकडे वळत आहेत , वराहाची मागणी मांस विक्री करीता मोठ्या प्रमाणात होते , तर त्याच्या कातडीपासून अनेक प्रकारचे वस्तु तयार केले जाते , यामुळे वराहाला बाजारांमध्ये मोठी मागणी आहे . वराहाचे मांस हे शरीराला सर्वाधिक पौष्टिक मानले जाते , यामुळे पंजाब , हरियाणा , उत्तर प्रदेश , उत्तराखंड , हिमाचल प्रदेश , याशिवाय महाराष्ट्र , मध्य प्रदेश व उत्तरेकडील राज्यांमध्ये वराहाच्या मांसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे .

वराहपालनासाठी मिळते कर्ज सुविधा : राज्य शासनांकडून विविध पशुपालन करीता कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते , तर राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत देखिल अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते . यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी सरकारमार्फत सहज कर्ज सुविधा उपलब्ध होण्यास सहकार्य होते .

किती मिळते कर्ज : वराहपालन करण्यासाठी 50 मादी आणि 5 नरांसाठी 15 लाख रुपये इतके कर्ज सुविधा तर 100 मादी व 10 नर याकरीता 30 लाख रुपये कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते . यावर सरकारकडून 30 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते .

लाभ कसा घ्याल : सरकारी योजनांच्या माध्यमातुन वराहपालन हा व्यवसाय करु इच्छिता तर , आपल्या जिल्हा / तालुका पशुसंवर्धन विभागास भेट द्यावा , अथवा ऑनलाईन पद्धतीने महाडीबीडी फार्मस या पोर्टलवर आवेदन सादर करु शकता ..

Leave a Comment