राज्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत ! टोमॅटोच्या भावामध्ये मोठी घसरण ! सरकार अनुदान देणार का ?

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : मागे एक ते दोन महिन्यापूर्वी टोमॅटो चे भाव 200 रुपयांपर्यंत गेले होते परंतु आता शेतकऱ्यांचा टोमॅटोचा गाडी भाडा निघत नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहे. शेतकऱ्यांना जगायचं कसं?शेतकऱ्यांचा मुलांनी शिकायचं कसं? शेतकरी आपले घर कसे चालवणार? इत्यादि प्रश्न शेतकरी राज्य सरकारला विचारात आहे.

टोमॅटो बजार समितीमध्ये नेऊन पण टॉमॅटो चा एक ट्रे 50 रुपये ते 100 रूपया पर्यंत विकत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? टोमॅटो लागवडीपासून तर बाजारामध्ये जायपर्यंत एका एकर टोमॅटोचे खर्च जवळपास 1 लाख 5 हजार येवढा खर्च येतो. आणि टोमॅटो बाजारामध्ये 5 रुपये किलो तर कुठे 10 रुपये किलो दराने विक्री केला जातो.

सध्या राज्यांमधे पाउस चालु झाला आहे परंतु दोन ते तीन दिवसापूर्वी राज्यामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पाऊसाचा खंड पडलेला होता त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यानी टोमॅटो ला टँकरने पाणी दिले आहे. आणि बाजारामध्ये टोमॅटो कवडी मोल भाव जात आहे. आजच्या परिस्थिमध्ये टेम्पोचा खर्च पण निघत नाही.

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या 20 शिखर परिषदेत बाजार समिती संपूर्ण बंद आहे याचा परिणाम स्थानिक बाजारपेठावर झालेला आहे यामुळे राज्यातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची पिके नुकसानामध्ये आलेली आहे. सध्या राज्यातील टोमॅटो पिकवणारे शेतकरी राज्य सरकारकडे टोमॅटोच्या दरामध्ये वाढ करावी अशी मागणी करत आहे.

राज्यसरकार कडून टोमॅटो पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावा असी राज्यातील शेतकरी मागणी करत आहे. आणि टोमॅटो च्या दरामध्ये वाढ करावी अशी पण मागणी करत आहे.

Leave a Comment