नागरिकांच्या हिताचे हिवाळी अधिवेशनात घेण्यात आले हे 5 महत्वपुर्ण दिलासादक निर्णय !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ These 5 important and comforting decisions were taken in the winter session for the benefit of the citizens ] : राज्याच्या हिवाळी अधिवेशनांमध्ये राज्यातील नागरिकांच्या हिताचे 5 महत्वपुर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आलेले आहेत . सदरचे निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

शेतकऱ्यांना वीज बील माफ : राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अधिवेशनात जाहीर केल्यानुसार , राज्यांमध्ये सध्यस्थितीत 9 लाख कृषीपंप आहेत . त्यांना कोणत्याही प्रकारचे वीज बील घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत . याशिवाय मागेल त्याला सौरपंप , व 3 महिन्यात कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

लाडकी बहीण योजना : निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल असे , विरोधकांकडून सांगण्यात येत होते . परंतु लाडकी बहीण योजना करीता अधिवेशनांमध्ये विशेष आर्थिक तरतुद करण्यात आलेली आहे .तर लाडकी बहीण योजनांसाठी देय असणार हप्ता अधिवेशन संपल्याच्या नंतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात येईल , अशी माहिती देण्यात आली आहे .

नाशिक येथे आयटी पार्क : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार , नाशिक येथे आयटी पार्क विकसित करण्यात येणार आहेत . यामुळे नाशिक करांना मोठा फायदा होणार आहे .

याशिवाय राज्यात वाढवण बंदराचे निर्माण करण्यासाठी 76 हजार कोटी निधीची तरतुद करण्यात आली आहे . तसेच महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी संकल्प कार्यक्रम अंतर्गत विविध कामांना गती देण्यात आली असुन , याकरीता विशेष निधीची तरतुद करण्यात आली आहे .

Leave a Comment