Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Transfer Update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे , सध्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणूकांमुळे आचार संहिता असल्याने , बदली प्रक्रिया रखडली आहे , राज्यांमध्ये दिनांक 20 मे 2024 रोजी शेवटच्या टप्यातील मतदान होणार आहे .
शेवटच्या टप्यातील मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्याच्या नंतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचा फैसला होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे . बदली प्रक्रिया बाबतच्या सा.प्र. विभागाच्या सन 2016 च्या शासन निर्णयानुसार , बदली बाबत सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे .
राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी / कर्मचारी , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार असुन राज्यातील आचार संहितामुळे सदर प्रक्रिया रखडली आहे . दिनांक 20 मे नंतर राज्यात शेवटच्या टप्यातील मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून , आचारसंहितामध्ये काही अंशी ढिल मिळेल , त्यानंतर सदर बदली प्रक्रिया बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे .
मिळालेल्या सुत्रानुसार राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बदली पात्र कर्मचाऱ्यांना 20 मे 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे . यानंतर कर्मचाऱ्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली केली जाईल , ज्याची कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत . अखेर दिनांक 20 मे नंतर बदली प्रक्रियेस अधिक वेग येणार असल्याची माहिती समोर येत आहे .
बदली प्रक्रिया संदर्भातील प्रक्रिया हि राज्य शासनांच्या सन 2016 च्या शासन निर्णयानुसार करण्यात येत असते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.