राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी संदर्भात काही महत्वपुर्ण प्रश्न व त्याची उत्तरे ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee service related Question and Answer ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी संदर्भात काही महत्वपुर्ण प्रश्न व त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

निवृत्तीनंतर अधिकारी / कर्मचारी यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणे बाबतचे धोरण काय आहे ? : – सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्याबाबतच्या तरतुदी शास.नि.सामान्य प्रशासन विभाग दि.09.11.1995 मध्ये करण्यात आल्या आहेत . यामधील अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक आहे . तसेच सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना नियमबाह्य मुदतवाढ , पुनर्नियुक्ती देता येत नाही .

अशा प्रकारच्या मंजूर पदांवर सेवाप्रवेश नियमातील तरतीनुसार विहीत मार्गाने सरळसेवा , पदोन्नती व प्रतिनियुक्ती इ. पद्धतीने पद भरण्याची कार्यवाही कटाक्षाने पुर्ण करणे आवश्यक असणार आहे , अशी तरतुद करण्यात आलेली आहे .

स्थायीत्व प्रमाणपत्र दिले जाण्यापुर्वी कर्मचाऱ्याची दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्यास , असे प्रमाणपत्र कोणत्या कार्यालयाने प्रदान करावे ? : – शासन परिपत्रक सा.प्र.वि. दि.16.12.1995 नुसार संबंधित कर्मचाऱ्याला तो स्थायित्व प्रमाणपत्र मिळण्यास ज्या दिनांकापासून पात्र ठरेल त्या दिनांकापासून ते देणे आवश्यक आहे , तसेच असे प्रमाणपत्र देण्यापुर्वी जर कर्मचाऱ्याची पदोन्नती , बदली अथवा अन्यत्र सामावून घेण्याची कार्यवाही झाली असेल ..

तर त्याच्या सध्याच्या कार्यालयाने तो त्यापुर्वी काम करीत असलेल्या कार्यालयाकडून शासन परिपत्रक दि.19.09.1975 मधील अटींची पर्तता संबंधित कर्मचारी करीता होता किंवा कसे याबाबतची माहिती मिळवून अशा कर्मचाऱ्यास स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे अशी तरतुद आहे , त्यानुसार कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या कार्यालयाने कार्यवाही करण्याची तरतुद आहे .

बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांपना अनुकंपा नियुक्ती लागु आहे का ? :- बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुबीयांना अनुकंपा नियुक्ती लागु नाही , तथाप‍ि बेपत्ता कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे सक्षम न्यायालयाकडून ज्या आदेशान्वये घोषित केले असेल त्या आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत बेपत्ता कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबियांनी अनुकंपा नियुक्तीसाठी परिपुर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर केल्यास , त्यांना अनुकंपा नियुक्ती लागु होते .

आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांस अनुकंपा नियुक्ती लागू आहे का ? : –सध्याच्या अनुकंपा नियुक्ती धोरणात कर्मचाऱ्याचा मृत्यु कोणत्या कारणाने झाला असल्यास , त्याच्या कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती लागु होईल , याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही . सबब आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याच्या पात्र वारसांनाही अनुकंपा नियुक्ती लागु होईल .

दिवंगत कर्मचाऱ्यास एक / दोन मुले असल्यास अथ्ज्ञवा दोनपैकी एकाचा मृत्यू झाला असल्याने त्याच्या पत्नीने ( कर्मचाऱ्याच्या सुनेने ) अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज सादर केल्यास , तिला अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होईल का ? : – राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि.23.08.1996 व दि.02.05.2001 नुसार कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसल्यास , व त्या कुटुंबात अनुकंपा नियुक्तीसाठी अन्य कोणी पात्र उमेदवार नसल्यास , त्य कर्मचाऱ्याची सून अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरते . सबब प्रश्नात नमुद परिस्थितीत कर्मचाऱ्याची सून अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही असे नमुद आहेत .

लगतचे 5 वर्षाचे गोपनिय अहवाल उपलब्ध नसल्यास कशाप्रकारे कार्यवाही करावी ? : – लगतचे 5 वर्षाचे गोपनिय अहवाल नसल्यास ज्या वर्षाचे गोपनिय अहवाल उपलब्ध नाहीत त्या बाबतची कारणे स्पष्ट करुन संबंधित वर्षाचा गोपनिय अहवाल उपलब्ध करुन घेणे शक्य असल्यास प्रकरण खुले ठेवावे व ज्यावेळी गोपनीय अहवाल उपलब्ध होतील त्यावेळी संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याची पात्रता तपासली जाते . मात्र एखाद्या अधिकारी / कर्मचाऱ्याचे गोपनिय अहवाल काही कारणास्तव उपलब्ध करुन घेणे अशक्य असल्यास ..गोपनिय अहवालाऐवजी अगोदरच्या वर्षाचे गोपनिय अहवाल विचारात घेतले जाते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment