Breaking News : विविध मागण्यांसाठी राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे नाशिकहुन थेट मुंबई पर्यंत बिऱ्हाड पायी मोर्चा !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागांमध्ये कार्यरत संवर्ग क ( शिक्षक ) व गट ड मध्ये ( स्वयंपाकी , कामाठी , पहारेकरी , मदतनिस ) अशा पदांवर रोजंदारी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी विविध मागणीसाठी आदिवासी आयुक्तालय नाशिक वरुन मुंबई पर्यंत पायी बिऱ्हाड मोर्चांस सुरुवात केलेली आहे .

यांमध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यातुन रोजंदारी कर्मचारी एकत्र आले असून , राज्यांतील शासकीय आदिवासी आमश्रमशाळा / वसतिगृहांमध्ये बऱ्याच दिवसांपासून रोजंदारी पद्धतीने अत्यल्प पगारात काम करत असून सदर कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावेत , तसेच मानधनात वाढ करण्यात यावी , रोजंदारी कर्मचाऱ्यांना इतर कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन देण्यात यावेत .अशा प्रमुख मागणीसाठी राज्यातील हजारो रोजंदारी कर्मचारी नाशिक आयुक्त कार्यालयातुन मुंबई मंत्रालयाकडे पायी मोर्चास सुरुवात केली आहे .

आदिवासी विकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सुधारित आकृतींबंधानुसार , रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती न करता आवश्यकता भासल्यास , बाह्यस्त्रोताद्वारे पदभरती करण्यात यावित असे निर्देशांचे पत्र प्रकल्प कार्यालयांकडून काढले जात असल्याने , राज्यातील हजारो रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आला असल्याने , सदर कर्मचाऱ्यांकडून आपल्या न्याय हक्कांसाठी पायी मोर्चा काढण्यात येत आहेत .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरुन परत शून्य टक्क्यांवर !

आदिवासी विकास विभागातील 10 वर्षांपेक्षा अधिक सेवा पुणे झालेल्या 1500 पेक्षा अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले आहेत . परंतु ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना रोजंदारी पद्धतीने 5 ते 9 वर्षे सेवा झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांचे काय ? असा प्रश्न रोजंदारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे . यामुळे सदर कर्मचारी सेवेत कायम करावेत या प्रमुख मागणीसाठी बिऱ्हाड पायी मोर्चा काढला जात आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment