आचार संहितामुळे राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना 4% डी.ए चा निर्णय लांबणीवर जाणार का ?

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Vadh Nirnay News ] : राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबतचा निर्णय आचारसंहितामुळे लांबणीवर जाणार का ? असे सर्वांना वाटत आहे . याबाबत सविस्तर आचारसंहिता नियम व सरकारच्या घोषणा याबाबत माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार डी.ए वाढ ही केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात येते . यामुळे प्रत्येक वेळी केंद्र सरकारने डी.ए वाढ लागु केल्यानंतर शासन निर्णयांमध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर डी.ए वाढ लागु करणेबाबत , उल्लेख करुन महागाई भत्ता मध्ये वाढ लागु केली जाते .केंद्र सरकारने माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनासोबत केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डी.ए मध्ये 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .

याच धर्तीवर राज्य सरकारने डी.ए वाढीबाबतचा निर्णय फक्त राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांबाबत घेण्यात आला आहे , तर सर्व राज्य कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या बाबतीत डी.ए वाढीचा निर्णय बाकी असतानाच आचार संहिता लागु झाल्याने , डी.ए वाढीचा निर्णय आता प्रलंबित होईल , अशी चिंता आता कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे .

कारण आचारसंहिता कालावधीमध्ये , सरकारला मतदारांकरीता प्रभावशाली असे निर्णय घेता येत नाहीत . परंतु डी.ए वाढीकरीता अर्थसंकल्पीय तरतुद असल्यास , डी.ए वाढीचा निर्णय घेतला जावू शकतो , कारण डी.ए वाढ ही माहे जानेवारी 2024 या कालावधीपासून लागु करणे नियोजित आहे .परंतु आचारसंहिता कालावधीमध्ये डी.ए वाढीसारखे महत्वपुर्ण निर्णय घेणे विद्यमान सरकारला अडचणी निर्माण होवू शकतील यामुळे डी.ए वाढीचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे .

राज्यात 20 मे पर्यंत निवडणुका आहेत , यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना डी.ए वाढीकरीता आणखीण दोन महिन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागू शकते ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment