सोयाबीन , कापुस , तुर या खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावामध्ये 5 ते 10 टक्के वाढ शक्य ; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean , Cotton , tur Hamibhav increase News ] : सोयाबीन , कापुस , तुर अशा खरीप हंगामांतील पिकांच्या हमीभावांमध्ये 5 ते 10 टक्के वाढ होणे शक्य होणार आहेत , केंद्रामध्ये नविन मंत्रीमंडळाच्या स्थापनेनंतर लगेचच हमीभाव जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

दर वर्षी  खरीप हंगामातील पिकांसाठी हमीभाव माहे जुन महिन्यांमध्ये जाहीर करण्यात येते , परंतु यंदाच्या वर्षी नविन सरकार स्थापनांमुळे हमीभाव जाहीर होण्यास विलंब झाला आहे . यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावांमध्ये 5 ते 10 टक्के वाढ करण्याची कृषिमुल्य आणि किंमत आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेली आहे .

केंद्र सरकारच्या कृषीमुल्य व किंमत आयोगामार्फत शिफारस केल्याप्रमाणे , सोयाबीनच्या हमीभावांमध्ये 05 टक्के वाढ तर , तुर कापुस अशा खरीप हंगामातील शेतीपिकांच्या हमीभावांमध्ये 10 टक्के पर्यंत वाढ करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे . सदरची सुधारित हमीभावाची वाढ ही केद्र सरकारच्या नविन सरकार स्थापने नंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हमीभावाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनुसार माहिती मिळाली आहे .

सदर समितीच्या शिफारशीनुसार , कापसाच्या हमीभावात 5 टक्के ते 7 टक्के पर्यंत वाढ होईल , तर सोयाबीनच्या हमीभावात 5 टक्के म्हणजेच गेल्या वर्षीच्या हमीभावापेक्षा 5 टक्के बाजारभावात वाढ केली जाणार आहे , गेल्या वर्षी सोयाबीनला 4600/- रुपये इतका हमीभाव होता , त्यामध्येच 5 टक्यांची वाढ केली जाणार आहे .

यंदाच्या वर्षी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहेत , यामुळे यंदाच्या वर्षी डाळ वर्गीय पिकांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे , म्हणूनच तुरीच्या हमीभावात देखिल 10 टक्के वाढ करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे .

मागील पाच वर्षांचा इतिहास पाहिले असता , केंद्र सरकारकडून हमीभाव हा माहे जुन महिन्यांतच जाहीर केला जातो , परंतु यंदा नविन सरकार स्थापनेमुळे हमीभाव जाहीर करण्यास थोडासा विलंब होवू शकतो .

Leave a Comment