राज्यामध्ये अवकाळी पावसाची मोठी शक्यता ; राज्यावर तिहेरी संकट – हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा ..

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ rain Update warning in maharashtra ] : राज्यामध्ये अवकाळी पावसाची मोठी शक्यता , भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे . तर राज्यावर तिहेरी संकट उद्भवणार असल्याचा , अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे .

देशामध्ये थंडीची लाट कमी होऊन अवकाळी पावसाची सुरुवात झाली आहे . याचा फटका देशातील महाराष्ट्र राज्यासह बऱ्याच राज्यांना बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . पुढील दोन दिवस देशाची राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . तर काही भागांमध्ये जोरदार गारपीट होण्याची संभावना व्यक्त करण्यात आली आहे .

राज्यामध्ये पुढील 12 तासात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून , वादळी –  वाऱ्यासह , मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . यामुळे वादळी वारे , गारपीट , मुसळधार पाऊस अशा प्रकारचे तिहेरी संकट राज्यावर उद्भवणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे .

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक , जळगाव , धुळे , अहमदनगर या जिल्ह्यामध्ये गारपिट होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे  . तर विदर्भामध्ये अकोला, वाशिम जिल्ह्यासह काही भागांमध्ये गारांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

Leave a Comment