Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Prepaid Meter ] : महाराष्ट्र राज्यात आता सर्वत्र ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यास युद्धपातळीवर काम करत आहेत . हे प्रिपेड मिटर लावण्यानंतर आपणांस मोबाईप्रमाणे आगाऊ रिचार्ज करावे लागणार आहेत . जर रिजार्च संपला तर विजपुरवठा देखिल खंडीत होवू शकतो ..
स्मार्ट प्रीपेड मिटर लावण्याचे कामकाज वेगाने सुरु : राज्यांमध्ये सध्याच्या घडीला मोठ्या शहरांमध्ये प्रीपेड मिटर लावण्याचे काम हे 60 टक्के पुर्ण झालेले आहेत , तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत आता ग्रामीण भागांमध्ये देखिल स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याचे काम सुरु करण्यात येत आहेत . यामुळे आता नागरिकांना विजेच्या वापरासाठी मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे अगोदर ( प्रिपेड ) रिचार्ज करावे लागणार आहेत .
प्रिपेड स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध : स्मार्ट मीटर मुळे आता नागरीकांना अगोदर रिचार्ज करुन विजेचा वापर करावा लागणार आहे , तर या पुर्वी विजेचा वापर केल्याच्या नंतर 40 दिवसाच्या अवधी पर्यंत वीजेच बिल भरण्याची मुफा होती . यामुळे जुन्या पद्धतीने नागरिकांना फायदा होतो . परंतु आता पुर्वीच बिल भरावा लागणार आहे . यामुळे नागरिकांकडून काही भागांमध्ये या मीटरला विरोध तर काही भागांमध्ये याचे स्वागत करण्यात येत आहेत .
स्मार्ट प्रीपेड मीटरचे वैशिष्ट्ये : या मीटरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मीटरचे रिचार्ज संपल्यानंतर ऑटोमॅटिक वीज पुरवठा खंडीत होतो . तर यापुर्वी ग्राहकाला तीन दिवसा अगोदर किती पैसे शिल्लक आहेत , त्या पैसांमध्ये अंदाजे किती दिवस विज पुरवठा होईल हे ग्राहकांना ह्या स्मार्ट मिटर मध्ये दर्शविले जाणार आहेत .