Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee vachanpatra ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून वचनपत्र घेणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य कर्मचाऱ्यांचा त्यांच्या सेवा काळात होणाऱ्या अतिप्रदानांच्या रकमांची वसुली क्षमापित करण्याबाबतच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालय , औरंगाबाद येथे दाखल करण्यात आलेल्या याचिका नुसार मा.उच्च न्यायालयाने याबाबत पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सरकारी खजिन्यातील निधी हा करदात्यांकडून जमा करण्यात आलेला सर्वसामान्य जनतेचा पैसा असून कोणत्याही करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होणार नाही , या दृष्टीने भविष्यात वसूल न होवू शकणाऱ्या अतिप्रदान होणाऱ्या रकमेस पायबंद घालणे गरजेचे आहे .
या करीता मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास भविष्यात होणाऱ्या अतिप्रदान रक्कमेचे परत वसुली बाबत त्यांच्याकडून लिहीत आशयाचे वचनपत्र घेण्यात यावेत असे सदर मा.उच्च न्यायालयाच्या आदेशांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
राज्यातील सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग / सरकारी कार्यालये / अनुदानित संस्था / स्थानिक स्वराज्य संस्था / स्वायत्त संस्था यांना या परिपत्रकाद्वारे सुचित करण्यात येते कि , कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रसंगी जसे कि वेतनवाढी / वेतननिश्चिती तसेच इतर कोणत्याही लाभाच्या / प्रदानाच्या अनुषंगाने अतिरिक्त प्रदान झाल्याची बाब भविष्यात सरकारच्या निदर्शनास आल्यास अतिप्रदानित रक्कम शासनास परत करण्याचे वचनपत्र संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या सेवाकालावधीत एकदाच घेण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत ..


आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.