Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Politics ] ; राज्याच्या राजकारणंमध्ये पुन्हा एकदा मोठे राजकीय भुकंपाचे संकेत देण्यात आलेले आहेत . कारण सध्याच्या परिस्थिती पाहता , शिंदे गट , अजित पवार गट , भारतीय जनता पार्टी , शरद पवार गट , उद्धव ठाकरे गट असे पक्ष नेमके वेगवेगळे लोकसभा निवडणूक लढणार कि , परत एकत्र येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत .
जयंत पाटील : राष्ट्रवादीचे नेते ( शदर पवार गट ) यांनी माहिती देताना सांगितले कि , राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली एकनिष्ठ असून , पुढील काही दिवसांमध्ये जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल . यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ही एक पक्ष म्हणून लढेल अशी भूमिका मांडली आहे .
शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष श्री.सुनिल तटकरे यांनी देखिल सांगितले कि , महाविकास आघाडी सरकार मधून प्रत्येक पक्षांमध्ये आज मोठी अस्थस्थता आहे . यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या परिने सर्वजन पर्याय शोधतील असे स्पष्टीकरण दिले आहेत .
शरद पवार गट व अजित पवार गट एकत्र निवडणुक लढणार ? : राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत , यांमध्ये अजित पवार यांनी सत्ते सहभाग घेतला आहे . परंतु राष्ट्रवादीचे दोन गट पडले हे केवळ सत्तेसाठी आहे , हे सर्वांनाचे म्हणने आहेत , कारण शिवसेना सारखे राष्ट्रवादी मध्ये भांडणे होत नाहीत . यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष आहे व निवडणुका पुर्वी एकत्रच येतील असे सर्वांचे म्हणने आहेत .
परंतु शिवसेनेचे दोन परत एकत्र येण्याची शक्यता नाही , परंतु वित्तमान सरकार मधील शिंदे गटातील काही जन परत उद्धव ठाकरे गटांमध्ये सामिल होण्याची शक्यता आहे . लोकसभा निवडणुका पुर्वीच राज्यांमध्ये मोठा राजकिय भुकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .कारण जागा वाटपावरुन अनेक जन नाराज होणार असल्याने , कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षातुन तिकिट भेटेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत .