सरकारी कर्मचाऱ्यांना 18 वर्षाची नोकरी पुर्ण झाल्याच्या नंतर करावे लागणार हे महत्वपुर्ण काम ; सरकारने काढला नविन अध्यादेश !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee new rules about service ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आता 18 वर्षाची नोकरी पुर्ण झाल्याच्या नंतर पेन्शन प्राप्ती करीता काही महत्वपुर्ण काम करावे लागणार आहेत . याबाबत सरकारकडून नविन अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे .

निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार , सरकारी कर्मचाऱ्यांने 18 वर्षे सेवा पुर्ण केल्याच्या नंतर त्याची स्वत : ची पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत . सदर अध्यादेश सर्वच विभागांना केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , ज्यांची सेवा ही 18 वर्षे पूर्ण झालेली आहे , व त्यांना सेवानिवृत्ती करीता 05 वर्षे अथवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे . अशांची पडताळणी होणे आवश्यक असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

निवृत्तीवेतनाचा लाभ घेण्याकरीता कर्मचाऱ्याच्या सर्व नोंदी आहेत कि , नाही याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत . सदर नोंदी ह्या संबंधित लेखा कार्यालय मार्फत पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

म्हणजेच सर्व प्रकारच्या नोंदी ह्या सदर कर्मचारी निवृत्त होण्याच्या 05 वर्षाच्या आधीच होणे आवश्यक असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे . तसेच कर्मचाऱ्यास आता त्याची पात्रता सेवा स्थिती दरवर्षी सादर करावी लागणार आहे . सदर पडताळणी मुळे कर्मचाऱ्यांस निवृत्तीनंतर पेन्शन प्राप्तीसाठी विलंब होणार नाही , तर काही आवश्यक बाबी / त्रुटींची पुर्तता सेवानिवृत्ती पुर्वीच केली जाईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment