शेतकऱ्यांसाठी लवकरच येणार मोठी खुशखबर ; शिंदे सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पुर्वीच सरसकट कर्जमाफी होणार ..

Spread the love

Live Marathipepar  संगिता पवार प्रतिनिधी [ farmer loan free nirnay news ] : राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोंबर – नोव्हेंबर या महिन्यांमध्ये होणार आहेत , त्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफी होण्याची शक्यता सर्वाधिक आहे , याकरीता कृषी विभागांकडून हालचाली देखिल सुरु असल्याचे सांगितले जात आहेत .

कर्जमाफी साठी आवश्यक असणारे निकष राज्य शासनांकडून तयार केले जात असल्याची माहिती समोर येत आहे . राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षावर मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे , सदर नाराजगी दुर करण्यासाठी राज्य शासनांकडून कर्जमाफी करुन सदर नाराजगी दुर केली जाणार आहे .

मिडीया रिपोर्टनुसार प्राप्त माहितीनुसार राज्यातील शिंदे फडणवीस – पवार सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत . याची घोषणा व अंमलबजावणी ही विधानसभा निवडणुकींच्या पुर्वीच केली जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहेत . यामुळे कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्यांना विधानसभा निवडणूकीपुर्वी दिलासा प्राप्त होणार आहे .

कर्जमाफी सरसकट करण्यात येणार : शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना सरसकट हा निकष लावण्यात येईल , कारण जेवढी जास्त कर्जमाफी करण्यात येईल , तेवढा फायदा विधानसभेत विद्यमान सरकारला होईल . यांमध्ये 50,000/- रुपये रक्कमेपर्यंतची कर्जमाफी केली जाण्याची शक्यता आहे .

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष सवलत : जे शेतकरी नियमित कर्जाची भरणा करत आहेत , अशा शेतकऱ्यांना व्याजदरांमध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे , तर ज्यांनी नियमित भरणा केलेला आहे , अशांना देखिल कर्जमाफी नंतर आर्थिक परतावा परत केला जाईल .

50 हजार रुपये पर्यंत सरसकट कर्जमाफी : राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा घेता यावा , याकरीता कर्जमाफीसाठी 50 हजार रुपये इतकी कमाल रक्कम ठरविली जाण्याची शक्यता आहे .

Leave a Comment