Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ E-pik pahani DCS info ] : ई-पीक पाहणी डीसीएस रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी करीता दिनांक 15 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे .यामुळे शेतकऱ्यांनी 15 जानेवारी पर्यंत ई-पीक पाहणी करुन घ्यावी .
ई-पीक पाहणी काय महत्वाची : ई-पीक पाहणी केल्याच्या नंतर सदर पिकाची नोंद ही सातबाऱ्यावर येत असते , ज्यामुळे सरकारी योजनांचा / अनुदानाचा लाभ हे ई-पीक पाहणीवर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच दिली जाते . याशिवाय बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जाते यामुळे ई-पीक पाहणी करणे महत्वाचे आहे .
ई-पीक पाहणी कसे करावेत ? : ई-पीक पाहणी करण्यासाठी आपल्या मोबाईलवर ई-पीक पाहणी नावाचे ॲप्स प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन घ्यावेत , यांमध्ये आपल्या नावाची शेताची तपशिल निवडून पिकाची नोंद करु शकता . जर आपणांस आपल्या महसूली गावास जोडून देण्यात आलेल्या , ऑपरेटरला संपर्क साधुन आपल्या रब्बी पिकाची ई-पीक पाहणी करुन घ्यावेत .
राज्य शासनांकडून दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात आलेली आहे कि , शेतकरी स्तरावील ई-पीक पाहणीची शेवटची तारीख ही दिनांक 15 जानेवारी 2025 अशी करण्यात आली आहे , तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी केली नाही .
त्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी या ॲप्सवर नोंद करुन घेण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत .