Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee UPS & SUDHARIT NPS SCHEME ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अखेर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक 01 मार्च 2024 पासून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे . त्याचबरोबर केंद्र सरकारची एकीकृत निवृत्तीवेतन योजना राज्य कर्मचाऱ्यांना जशाच्या तशी लागू करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे . राज्य कर्मचाऱ्यांना या दोन्ही योजनेपैकी एका योजनेमध्ये सहभागी होण्यास मुभा देण्यात आलेली आहे .
याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनासाठी एक वेळ पर्याय म्हणून दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प सादर करायचे आहेत . तर केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत दिनांक 31 मार्च 2017 पर्यंत विकल्प सादर करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे . सदर पेन्शन योजना राज्यातील शासकीय मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था , कृषी विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालय तसेच राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येत आहे .
सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतील ठळक वैशिष्ट्ये : सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% इतकी रक्कम व त्यावरील महागाई भत्ता त्याचबरोबर निवृत्तीवेतनाच्या 60% इतकी कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळेल . सदर पेन्शन योजना दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येत आहे , सदर पेन्शन योजने अंतर्गत कर्मचारीची 20 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास , त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% निवृत्तीवेतन अनुज्ञेय असेल . तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्षे पेक्षा कमी व दहा वर्षापेक्षा जास्त आशा कर्मचाऱ्यांना नियत वयमानुसार सेवानिवृत्त होत असल्यास , त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन लागू करण्यात येईल .ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयमानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्तीवेतन 7500/- इतकी निश्चत करण्यात येईल .
केंद्र सरकारची एकीकृत निवृत्तीवेतन योजनेची ठळक वैशिष्ट्ये : सदर पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन प्राप्ती करिता कर्मचाऱ्यांची किमान 25 वर्ष सेवा होणे आवश्यक असेल , तर कमीत कमी दहा वर्ष सेवा ग्राह्य धरण्यात येईल , यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 25 वर्षे पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल . तर किमान दहा वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 10,000/- रूपये प्रतिमहा पेन्शनची सुविधा देण्यात आली आहे . सदर पेन्शन योजनेमध्ये देखील महागाई भत्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे , तर सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचारी योगदान 10 टक्के कायम ठेवण्यात आले असून , सरकारचे योगदान 14 टक्के वरून 18.5% इतके करण्यात आली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.