जुनी पेन्शन खरच कर्मचाऱ्यांना किती महत्वाची आहे ? जाणून घ्या संक्षिप्त माहिती , सदर लेखातुन ..

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension importance details ] : जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना किती महत्वाची आहे ? याबाबत सदर लेखातुन संक्षिप्त माहिती विशद करण्यात आलेली आहे . सध्य स्थितीमध्ये राज्यातच नव्हे तर देशातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनांची मागणी करण्यात येत आहेत .

कर्मचारी योगदानाचा सर्वाधिक मोठा आर्थिक तोटा : राष्ट्रीय पेन्शन योजना असो कि नविन युनिफाईड पेन्शन योजना असो त्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे 10 टक्के योगदान कायम ठेवण्यात आलेले आहेत . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे . कारण जुनी पेन्शन योजनांमध्ये 10 टक्के कर्मचारी योगदान नाही .

म्हणजेच 10 टक्के कर्मचारी योगदानांची रक्कम निवृत्तीपर्यंत करोडो रुपये होते , जी रक्कम कर्मचाऱ्यांना मिळतच नाही . सदर रक्कमे पैकी कर्मचारी केवळ अत्यावश्यक बाबींकरीताच केवळ 40 टक्के कर्मचारी योगदान काढण्याची तरतुद आहे , परंतु सदर रक्कम काढण्यासाठी अवघड प्रक्रियातुन सामोरे जावे लागते .

GPF सुविधा : जुनी पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजनांची सुविधा आहे . ज्यांमध्ये कर्मचारी आपल्या परीने विशिष्ट रक्कम दरमहा गुंतवू शकतो , ज्यावर इतर बँकेच्या मुदत ठेव पेक्षा अधिक व्याजदर दिला जातो , सदर रक्कम कर्मचाऱ्यांच्या विविध कार्यक्रम , अत्यावश्यक बाबीकरीता काढण्यासाठी सुविधा आहे , ज्याची प्रक्रिया देखिल अत्यंत सोपी आहे .

जुनी पेन्शन मध्ये शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन : जुनी पेन्शन योजनांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मिळत असणाऱ्या शेवटच्या मुळ वेतनांच्या 50 टक्के पेन्शन दिली जाते , त्यावर चालु विद्यमान महागाई भत्ता देखिल दिला जातो . यामुळे जुनी पेन्शन योजनांमध्ये अधिक आर्थिक लाभ मिळतो ..

Leave a Comment