Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra states ativrushti update news] : राज्यामध्ये पुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे , यामुळे राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे . अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होईल याबाबत सविस्तर अपडेट खालील प्रमाणे जाणून घेऊयात ..
भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार , आज पासून पुढील तीन दिवस राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . या पावसामुळे अतिवृष्टी होण्याची संभावना अधिक असल्याचे , नमूद करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई व उपनगरमध्ये अति मुसळधार पावसामुळे पुढील तीन दिवस अतिवृष्टी होण्याची संभावना हवामान खात्याने दिली आहे .
विदर्भातील यवतमाळ , वाशिम, वर्धा , गोंदिया ,नागपूर ,गडचिरोली, चंद्रपूर ,बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून , सदर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . यापैकी काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
मध्य महाराष्ट्रातील बराच भागामध्ये अति मुसळधार पावसाची संभावना व्यक्त करण्यात आली असून , या भागामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे . त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस विजेच्या कडाक्यासह होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
राज्यामध्ये पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसासह 50 ते 60 किमी वेगाने वादळी वाऱ्याचे संकट येणार असल्याचे संकेत देण्यात आली आहे . यामुळे महाराष्ट्र राज्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला असून , प्रशासनाकडून मदतीकरिता पूर्व सूचना देण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !