DA Increase : आचारसंहिता कालावधीमध्येच “या” राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढला , अधिकृत निर्णय जाहीर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Mahagai Bhatta Increase Nirnay ] : ऐन आचार संहिता कालावधीमध्ये महागाई भत्ता वाढ करणेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे .

सदरचा वाढीव महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या धर्तीवर लागु करण्यात आल्याने , आचार संहिता नियमांचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होत नाही , कारण कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही नियोजित वेळाप्रमाणे मिळत असते . सदर डी.ए वाढीचा निर्णय हा त्रिपुर राज्य सरकारने घेतला आहे . त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री मा. माणिक साहा यांनी सदर महागाई भत्ता वाढ करणेबाबत अधिकृत्त निर्णय घेतला आहे .

सदर डी.ए वाढ ही दिनांक 01 जानेवारी 2024 पासून डी.ए फरकासह लागु करण्यात आली आहे , तसेच सदरचा लाभ हा सेवानिवृत्त पेन्शनधारकांसाठी देखिल लागु करण्यात आलेली आहे .

5 टक्यांची डी.ए वाढ : दिनांक 01 जानेवारी 2024 पासून त्रिपुरा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त पेन्शनधारकांना 5 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे , यामुळे सदर राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी / सेवानिवृत्त पेन्शनधारकांचा एकुण महागाई भत्ता हा 25 टक्के इतका झाला आहे .

या निर्णयामुळे त्रिपुरा राज्य सरकारला दरवर्षी 500/- कोटी रुपयांची अतिरिक्त तरतुद करावी लागणार आहे . सदर निर्णयाचा फायदा त्रिपुरा राज्यातील 80 हजार पेन्शनधारक तर 1 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे .

केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना 01 जानेवारी 2024 पासून डी.ए वाढ लागू करणेबाबतचा निर्णय राज्य सरकारने आचार संहिता मुळे थांबविला आहे , तर त्रिपुरा राज्य सरकारने आचार संहिता कालावधी देखिल डी.ए वाढीचा निर्णय घेवून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment