राज्यात रेड अलर्ट : “या” 21 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची मोठी शक्यता ; वाचा सविस्तर बातमी !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state Rain Update ] : राज्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे , कारण राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा वादळी – वाऱ्यांसह अवकाळी पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

राज्यांमध्ये मार्च महिन्यांपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झालेली होती , यामुळे मार्च महिन्यांत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखिल झाले . आता राज्यातील 21 जिल्ह्यांना पुन्हा एकदा रेड अलर्ट सांगण्यात आलेले आहेत . यांमध्ये राज्यातील मराठवाडा , विदर्भ व जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर , सोलापुर या 21 जिल्ह्यांमध्ये 15 एप्रिल पर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत .

वादळी वाऱ्यांमध्ये वाऱ्यांचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने , शेतीमाल पिकांचे इतर शेतांमधील शेड इ. मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . काल दिनांक 12 एप्रिल रोजी विदर्भातील चंद्रपुर , गडचिरोडी तसेच गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जानासह वादळी पाऊस पडला . सदर वाऱ्यांचा वेग हा 50 ते 60 किलोमिटर प्रति तास इतका होतो , यामुळे या वाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .

सध्या राज्यातील तापमान कमी होताना दिसून येत आहे , कारण चंद्रपुर मधील तापमान 48 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात आलेला होता , सध्या राज्यातील सर्वसाधारण तापमान हे 40 ते 41 अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आलेला आहे . सध्या दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत वादळ – वाऱ्यांसह गारपीटाची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे . विदर्भांमध्ये 30 एप्रिल पर्यंत अलर्ट जारी आहे .तुर्तास वरील 21‍ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

सध्या राज्यातील वरील नमुद 21 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने , शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या जिवाची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , कारण या वादळी वाऱ्यांमध्ये अनेक वाईट घटना समोर आलेल्या आहेत .

Leave a Comment