दिनांक 13.03.2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 26 मोठे, महत्वपुर्ण निर्णय !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Cabinet Nirnay dated 13.03.2024 ] : राज्य शासनांकडून काल दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध 26 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . यांमध्ये राज्यातील सर्व गटांना लाभ होईल अशा प्रकारचे 26 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत . सविस्तर 26 कॅबिनेट मंत्रीमंडळ निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अहमदनगर शहर / जिल्ह्याचे नामकरण : अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . या बाबत केंद्रीय मंत्रालयास शिफारस करण्यात आलेली असून राज्यातील सर्व विभागास नामकरण करणेबाबत कार्यवाहीचे आदेश देण्यात आलेले आहेत .

मुंबईमधील 8 रेल्वे स्थानकांचे नावे बदलण्याचा निर्णय : मुंबई मधील करी रेल्वे स्थानकाचे नाव – लालबाग रेल्वे स्थानक , किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव – तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक , सॅण्डहर्स्ट रेल्वे स्थनकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक , मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव – मुंबादेवी रेल्वे स्थानक , चर्नीरोड रेल्वे स्थानकाचे नाव गिरगाव रेल्वे स्थानक , कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव  काळाचौकी रैल्वे स्थानक , डॉक यार्ड रेल्वे स्थानकाचे नाव माझगार रेल्वे स्थानक असे नामांतर करण्यात आलेले आहेत .

शुभमंगल सामूहिक विवाह योजना करीता अनुदानांमध्ये वाढ : महाराष्ट्र राज्य शासनांकडून शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यात येते , या योजना अंतर्गत अनुदानांमध्ये वाढ करुन आता 25,000/- रुपये इतका करण्याचा राज्य शासनांने कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर निर्णयानंतर आदिवासी विकास विभाग , सामाजिक न्याय विभाग तसेच बहुजन कल्याण व इतर विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देणाऱ्या अनुदानांमध्ये वाढ करण्यात निर्णय घेण्यात आला आहे .

इतर महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय पुढीलप्रमाणे आहेत ..

  • श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी अतिथीगृह बाधण्यासाठी अडीच एकर भूखंड घेण्याचा निर्णय ..
  • नवतंज्ञानाचा समावेश असणारे मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आले ..
  • NHM ( राष्ट्रीय आरोग्य अभियान ) मधील 10 वर्षे पुर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याचा निर्णय ..
  • आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविकांच्या मानधन मध्ये 5 हजार तर पोटील पाटील यांना दरमहा 15,000/-मानधन देण्याचा तसेच मानसेवी वैद्यकीय अध्यापकांना 30,000/- तर सहयोगी प्राध्यापकांना 25,000/- रुपये मानधन देण्याचा मोठा निर्णय ..
  • आयटीआय ( ITI ) मधील कंत्राटी शिल्प निदेशकांना शासन सेवेत सामावून घेण्यात येणार ..
  • जालना – खामगाव नविन ब्रॉड गेज रेल्वे मार्ग , करीता राज्य शासनांच्या हिश्याचा वाटा 2453 कोटी रुपये देण्यास मान्यता ..
  • महाराष्ट्र राज्य व गोवा राज्य वकील परिषदेच्या अकादमीकरीता कळव्यात शासकीय जमीन
  • पुणे जिल्हा मध्ये स्थित वेल्हे या तालुक्याचे नामकरण राजगड करण्यास कॅबिनेट मंत्रीमंडळाची मान्यता .
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत राज्यात 23 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यास मान्यता ..
  • मुंबई उपनगरातील उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता
  • मंगळवेढा या उपसा सिंचन योजनास मान्यता , यामुळे तब्बल 35 गावांना होणार लाभ
  • पशु संवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रिकरण करुन पुनर्रचना करुन प्रशासनांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता ..
  • कौशल्य विद्यापीठ कुलगुरु निवडीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय ..
  • केंद्र सरकारच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा अधिक बळकट करण्यासाठी राज्याच्या हिश्याला येणारे 153 कोटी खर्चास मान्यता देण्यात आले आहेत .
  • महानंद दुध संघाची स्थिती सुधारणा करण्यासाठी पुढील पाच वर्षाकरीता राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे व्यवस्थापन देण्याचा निर्णय ..
  • मुर्तिजापुर येथील साठवण तलाव दुरुस्तीच्या कामास मान्यता ..
  • म्हसळा तालुक्यात युनानी महाविद्यालय स्थापनेस मान्यता .
  • राज्यातील कोल्हापुर , सांगली या जिल्हा मधील येणाऱ्या पुराच्या नियंत्रण करण्यासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचा निर्णय ..
  • कृषी वाहिनीचे सौर उर्जिकरणासाठी SBI बँकेकडून कर्ज घेण्यास मंजुरी ..
  • कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्याकरीता ADB बँकेकडून कर्ज घेण्यास मान्यता .
  • सहकारी गृह- निर्माण संस्थांचे भोगवटा मूल्य कमी करण्याचा मोठा निर्णय ..

Leave a Comment