Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Vetan Padatalani ] : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक वेतन पडताळणी होणे आवश्यक असते , व आलेल्या आक्षेपांचे प्रमाण कमी करुन घेणे गरजेचे असते . जेणे करुन सेवानिवृत्ती पर्यंत कोणत्याही प्रकारेच आक्षेप बाकी राहणार नाहीत , व लगेच पेन्शन सुरु केली जाईल .
वेतन पडताळणीचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत : यांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्याच वेतनश्रेणीत कर्मचाऱ्यांने वेतन घेतले आहेत का ? , तसेच वार्षिक वेतनवाढी ह्या नियमित लागु केलेल्या आहेत का . , विनावेतन रजा खाजगी कारणास्तव असल्यास वेतन वाढ पुढे ढकलण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे का . वेतनश्रेणीच्या सुरुवातीच्या वेतनावर सुरु आहे का अधिक वेतन देण्यात आलेले आहेत ,अधिक वेतन दिल्यास त्या प्रकारची तरतुद आहे का .?
पदोन्नती वेतननिश्चिती बरोबर आहे का ? विकल्प दिला असल्यास त्याची नोंद आहे का . तसेच वेतन रचना वेळी विकल्प दिला आहे काय , सदर विहीत कालावधीमध्ये आहे काय ? तसेच यापुर्वी वेतन पडताळणी झाली आहे का , झाली असल्यास त्यानंतर परत वेतन पडताळणी होणेपर्यंतच्या वेतन पडताळणी बरोबर आहेत का ? तसेच आगाऊ वेतन लागु असल्यास सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाने लागु करण्यात आलेली आहे का ?
💁💁 हे पण वाचा : तलाठी पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हानिहाय जाहीर !
तसेच हिंदी , मराठी भाषा परीक्षा सुट बाबत परीक्षा उत्तीर्ण नसल्यास , वेतनवाढी थांबविल्या आहेत काय ? तसेच ज्या विभागीय परीक्षा पास झाले नाही म्हणून वेतनवाढी थांबविण्याची गरज असते ती उत्तीर्ण आहे काय ?
सदर मुद्यांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असणार आहेत . म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 व सुधारित नियम 1988 / 1998 / 2009 यामधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन हाणे आवश्यक असणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.