महावितरण : आता मोबाईल प्रमाणे लाईट साठी करावा लागणार प्रिपेड रिचार्ज ! प्लॅन संपल्यास वीजपुरवठा होणार खंडीत .

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : आता महाराष्ट्र राज्यात देखिल महावितरण कंपनीकडून प्रिपेड मीटर लावण्यास सुरुवात करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये नागरिकांना सुरुळीत वीजपुरवठा हवा आहे अशांना आता मोबाईल प्रमाणे पहिल्यांदा रिचार्ज करावा लागणार आहे , जर रिचार्जची वैधाता संपल्यास वीजपुरवठा पुर्णपणे खंडीत केला जाणार आहे . ज्यामुळे नागरीकांना काही अंशी नियमित विजपुरवठापासून वंचित रहावे लागणार आहे , किंवा अगोदरच रिचार्ज करावे लागणार आहेत .

राज्या प्रिपेड मीटर सुरु करण्यासाठी महावितरण कंपनी कडून चार कंपन्यांना 26 कोटी रुपयांचे निविदा सादर झालेले आहेत . सदर कंपनीकडून येत्या 27 महिन्यांच्या कालावधीत राज्यभर प्रिपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत .सदर प्रिपेड मीटर सुरुळीत चालविण्याची तसेच खराब झालेल्या मिटरची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राट घेतलेल्या कंपनीवर असणार आहे .

प्रिपेड मीटर बसविण्याची आवश्यकता : सध्या विजाची मोठ्या प्रमाणात चोरी सऱ्हास होत असताना ,महावितरण कंपनीच्या निदर्शनास आल्याने , दिल्ली , मुंबई , चैन्नई , कोल्हापुर अशा मोठ्या शहराप्रमाणे संपुर्ण राज्यात प्रिपेड मीटर बसविण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे . ज्यामुळे वीज चोरीचे प्रमाणे 90 टक्के कमी होणार आहे . शिवाय हे मिटर प्रिपेड व स्मार्ट असल्याने वीजचोरीचा प्रयत्न होणे अशक्यच आहे .

रिचार्जचे असणार प्लॅन : वीज युनिटच्या वापराच्या प्लॅननुसार रिचार्जचे प्लॅन असणार आहेत , वार्षिक प्लॅनचा रिचार्ज केल्यास , मोबाईल प्लॅन प्रमाणे डिस्कांऊंट दिले जाणार आहेत , शिवाय मोबाईच्या रिचार्जची वैधता संपल्यानंतर 10 रुपये इमरजन्सी लोन ऑफर दिली जाते , त्याप्रमाणे यांमध्ये देखिल 01 ते 02 दिवस वीज पुरवठा सुरळीत चालेले अशा पद्धतीने लोनची ऑपरु दिली जाणार आहे .

एका बाजुला महावितरण कंपनीकडून डिजीटज पद्धतीने पैसे गोळा करण्याचा विचार असला तरी आज देखिल शेतकरी / ग्रामीण भागांमध्ये किती तास वीजपुरवठा केला जातो यावर चिंता व्यक्त करण्याची गरज आहे .खरे तर शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागात देखिल 24 तास विजपुरवठा होणे आवश्यक आहे , तेव्हाच देश प्रगतीपथावर जाणार आहे .

Leave a Comment