Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pik vima yojana mudatvadh ] : रब्बी पिकांच्या विमा नोंदणी करीता मुदवाढ देण्यात आली असून , प्रधान मंत्री फसल बिमा योजना अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 जानेवारी 2025 अशी करण्यात आली आहे .
यापुर्वी रब्बी पिकांच्या विमा नोंदणी करीता दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती . तर आता मुदतवाढ करुन दिनांक 15 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे , यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी दिनांक 15 जानेवारी पर्यंत विमा नोंदणी करुन घ्यायची आहे .
राज्यांमध्ये विविध योजनांच्या लाभाकरीता सीएससी केंद्रावर गर्दी होत होती , परिणामी शेतकऱ्यांना विमा नोंदणी करता आली नसल्याने , दिनांक 15 जानेवारी पर्यंत विमा नोंदणीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे . सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे .
प्रधानमंत्री फसर विमा योजनाची सुरुवात दि.18 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात आली असून या योजनांची सुरुवात करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पिकांच्या नुकसानीकरीता शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे , उच्च तापमान , अतिवृष्टी तसेच आर्द्रता या सारख्या परिस्थितीतुन आर्थिक मदत मिळावी याकरीता सदर योजनांतुन विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
अर्ज कसा कराल : याकरीता बँकेच्या शाखेत जावून विमा नोंदणी करता येते , याशिवाय https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळावर विमा नोंदणी करु शकता .