शेअर मार्केट कोसळल्यानंतर आपला पैसा नेमका जातो तरी कोठे ? जाणून घ्या सविस्तर गणित ..

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ After the collapse of the stock market, where exactly does your money go ? ] : शेअर मार्केट कोसळ्याच्यानंतर आपला पैसा नेमका कुठे जातो ?  याबाबत अनेकांना शंका आहे , या संदर्भात शेअर बाजाराचे गणित “या” लेखामध्ये समजून घेवूयात ..

सध्या शेअर मार्केटमध्ये लगातार चार महिन्यापासून घसरण सुरू आहे , यामध्ये गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहेत . शेअर मार्केटमध्ये ही चढ-उतार बऱ्याच वेळा पाहायला मिळते . परंतु अचानक शेअर मार्केट क्रॅश झाल्याच्या नंतर गुंतवणूकदारांचे पैसे कोठे जातात , याबाबत अनेकांना प्रश्न उपस्थित होते.

तर शेअर बाजार हे एक प्रकारचे मागणी आणि पुरवठा या नियमावर आधारित असतो . ज्या शेअरची किंमत भविष्यात वाढणार आहे किंवा त्याची कामगिरी भविष्यात चांगली होईल , अशा शेअरची मागणी वाढल्याने त्या शेअरची किंमत वाढत असते . या उलट ज्या कंपनीचा नफा कमी होणार आहे , अशा शेअरची मागणी कमी होईल व परिणामी किंमत देखील कमी होत जाते , यामुळे अशा शेअरची किंमत घसरत असते .

कंपनीला भाग भांडवल तयार करण्यासाठी भारतीय सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ( SEBI ) कडे रजिस्ट्रेशन करून शेअरच्या माध्यमातून पैसा तयार करीत असते . ज्यावेळेस गुंतवणूकदार सदर कंपनीच्या शेअरमध्ये पैसा गुंतवत असतात , त्यावेळेस त्या कंपनीच्या नफा पोटामध्ये गुंतवणूकदार प्रत्यक्ष सहभागी होत असतात . म्हणजेच जेवढे शेअर तेवढे त्यांचा कंपनीतील भाग (मालकी ) असते .

जर शेअर बाजार कमी होत असल्यास , गुंतवणूकदारांचे होणारे नुकसानी मधील पैसा हा कुठेही गायब होत नसतो , तर सदर शेअरची किंमत (मूल्य) कमी होते . ज्यावेळेस शेअरची खरेदी वाढत असते त्यावेळेस शेअरची किंमत वाढत असते . म्हणजेच मार्केट क्रॅश झाल्याच्या नंतर शेअरची किंमत (मूल्य) फक्त कमी होते . सोप्या भाषेमध्ये मार्केट झाल्याच्यानंतर शेअरची किंमत कमी होते , म्हणजेच मूल्य कमी होते . तर गुंतवणूकदाराचा पैसा असेल तेवढा राहतो , परंतु शेअरचे मूल्य कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होते .

Leave a Comment